![]() |
दूर्गदूर्गेश्वर श्रीमान रायगड
भौगोलिक स्थान
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. किल्ल्यावर पोहोचण्या साठी आपल्याला जवळ-जवळ 1400 ते 1450 पायऱ्या चढून जाव्या लागतात. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या शतकात] याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.
प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.
सभासद बखर म्हणते -
“
राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.
”
याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. :- १.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर.
'देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि' हे बघून महाराज खुशीने म्हणाले… 'तख्तास जागा हाच गड करावा'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे.
शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनिअरने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.
शिवराज्याभिषेक
शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.
कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की -
“
शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ.स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरूवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ.स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकीर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला.
”
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
जगदीश्वर मंदिराची पहिली पायरी, ज्यावर रायगडाचे वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांचे नाव कोरलेले आहे
१. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
२. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित् दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झ़ाला आहे.
३. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित् दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
५. महादरवाजा : महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंचं आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
६. चोरदिंडी : महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
७. हत्ती तलाव : महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
८. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
९. स्तंभ : गंगासागराचा दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराचा शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
१०. पालखी दरवाजा : स्तंभांचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
११. मेणा दरवाजा : पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
१२. राजभवन : राणीवशाचा समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याचा अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.
१३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
१४. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झ़ाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’
१५. नगारखाना : सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
१६. बाजारपेठ : नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांचा काळातील बाजारपेठ. पेठेचा दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.हे बाजार पेठ आजही हुबेहुब जसेचा तसेच आहे.
शिरकाई देऊळ
१७. शिरकाई देऊळ : महाराजांचा पुतळ्याचा डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांचा काळात मावळकर नावाचा इंजिनिअराने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.
जगदीश्वर मंदिराची पहिली पायरी, ज्यावर रायगडाचे वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांचे नाव कोरलेले आहे
१८. जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याचा भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराचा पायऱ्यांचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाचा उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे - श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांचा आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
१९. महाराजांची समाधी : मंदिराचा पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२चैत्र (शुद्ध १५ (इसवी1680)या दिवशी रायगड येथे झ़ाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याचा महाद्वाराचा बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाचा चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींचा अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याचा पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांचा समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.
२०. कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेतला नंदी दिसतो.
२१. वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती.
२२. टकमक टोक : बाजारपेठेचा समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूचा कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते.आधीपासुनच शिवराज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.
२३. हिरकणी टोक : गंगासागराचा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेचा माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.
२४. वाघ्या कुत्र्याची समाधी : इतिहासात असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांंचा अत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली.
२५.पाचाड जिजाबाई वाडा :
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई जिजामाता यांना गडावरील थंड हवा आणि वातावरण सोसत नव्हते म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाड जवळ एक वाडा बांधला. तो वाडा आपल्याला आज देखील पाहायला मिळतो.
२६.राणी वसा:
रायगड किल्ल्यावर आपल्याला राणी वसा देखील पाहायला मिळतो ज्यामध्ये प्रत्येक खोलीमध्ये संलग्न शयनगृह होते पण आता या राणी वश्याचे काही अवशेष पाहायला मिळतात.
रायगडावरील अश्मयुगीन गुहा
पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडचा दोरवाटेचा (रोप वेचा) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेले, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाचा विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांचा चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा.' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून येथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याचा झ़ुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वसतीस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणाऱ्याला जाणवते.
शाळा महाविद्यालयांचा आणि अनेक पर्यटन कंपन्यांचा सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते.
रायगड किल्ल्यावरील पाच दरवाजे
• महा दरवाजा
महा दरवाजा म्हणजे रायगड किल्ल्यामध्ये ज्या दरवाज्यामधून प्रवेश करावा लागतो जो आपल्याला गडावर गेल्यानंतर भव्य आणि मोठा दरवाजा दिसतो त्याला महा दरवाजा म्हणतात. हा दरवाजा ३५० वर्षापूर्वी बांधला आहे तसेच हा दरवाजा अश्याप्रकारे बनवला आहे जेथे शत्रू हत्तीच्या सहाय्याने हा दरवाजा तोडू शकत नाही. रायगडचा महादरवाजा सूर्योदय झाल्यानंतर उघडतात आणि सूर्यास्तानंतर बंद केले जातात.
• नागर्चना दरवाजा :
नागर्चना दरवाजाला नगारखाना दरवाजा म्हणून ओळखले जाते. नगारखाना हे बाले किल्ल्यावर जाण्यासाठीचे एक मुख्य प्रवेशद्वार आहे जे आपल्याला सिंहासनाच्या समोर पाहायला मिळते.
• पालखी दरवाजा :
रायगड किल्ल्यावर पालखी दरवाजा देखील आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी या दरवाजाचा देखील उपयोग केला जातो. हा दरवाजा गडावर स्तंभाच्या पश्चिमेकडे आहे जप आपल्याला ३१ पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर लागतो. असे म्हंटले जाते कि याच दरवाजातून छत्रपती शिवाजी महाराजांची, जीजामातांची तसेच सर्व राण्यांच्या पालख्या येथूनच जात होत्या म्हणून या दरवाजाला पालखी दरवाजा म्हणतले जाते.
• मेणा दरवाजा :
मेणा दरवाजा हा आपल्यला जर आपण गडावर रोप वे ने गेलो तर तेथून काही पायऱ्या वरती चढून गेल्यानंतर जो दरवाजा लागतो त्या दरवाज्याला मेणा दरवाजा म्हणतात. ह्या दरवाजाने सरळ गेले कि पालखी दरवाजा लागतो हे दोन्ही दरवाजे सरळ रेषेमध्ये आहेत.
• वाघ दरवाजा :
वाघ दरवाजा म्हणजे आपत्कालीन दरवाजा होय कारण या दरवाज्यातून किल्ल्यावर येणे तसे अशक्यच आहे. या दरवाज्याकडे जाण्यासाठी कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत जावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला सहसा न दृष्टीस येणार आपत्कालीन दरवाजा गडावर बांधून घेतला होता.
रायगड किल्ल्याबद्दल काय विशेष आहे?
किल्ल्याच्या चारही दिशांना रायगड प्रचंड खडकांनी वेढलेला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी एक प्रचंड तलाव आहे ज्याला ‘बदामी तालाब’ म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या आत पिण्याच्या पाण्याचे दोन स्रोत आहेत, जे गंगा-यमुना म्हणून ओळखले जातात. जर तुम्ही किल्ल्याच्या बाजूने पाहिले तर तुम्हाला जमिनीचे 360 अंश सहज दिसू शकतात. (Raigad Fort Information in Marathi) सैनिक येथून शत्रूचा हल्ला हाताळायचे. तो किल्ला रायगड त्याच्या सैन्यापासून आणि त्याच्या शत्रूंपासून प्रजेच्या संरक्षणासाठी बांधला गेला होता.
रायगड किल्ल्याची रचना
हा किल्ल्यातील मुख्य दरवाजा आहे जो महा दरवाजा म्हणून ओळखला जातो. रायगड किल्ल्याच्या संरचनेबद्दल बोलायचे झाले तर, सध्याच्या शिवाजी महाराजांची समाधी, राज्याभिषेक स्थळ, शिवमंदिर आणि रायगड किल्ल्याची इतर ठिकाणे भग्नावस्थेत बदलली आहेत. रायगड किल्ल्याच्या अवशेषांमध्ये क्वीन्स क्वार्टर अजूनही अस्तित्वात आहे. जेथे सहा खोल्या देखील अस्तित्वात आहेत. रायगड किल्ल्याचा पहिला राजवाडा लाकडाचा वापर करून बांधण्यात आला. सभागृहाच्या अवशेषांमध्ये पहारेकरी, गढ आणि दरबार उपस्थित आहेत. हे पर्यटकांना भेट देण्यासारखे ठिकाण आहे. रायगड किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या एका तलावाला ‘बदामी तालाब’ असेही म्हणतात. रायगड किल्ल्याजवळ गंगा सागर तलाव पसरतो. रायगड किल्ल्याजवळ काही प्रसिद्ध भिंत देखील आहे. जी हिरानी बुर्ज म्हणून ओळखली जाते आणि ती दुसरी हिरकणी बस्ती म्हणूनही ओळखली जाते. रायगड किल्ल्याच्या आत असलेला मेना दरवाजा हा दुय्यम प्रवेशद्वार आहे जो शाही महिलांसाठी खाजगी प्रवेशद्वार म्हणून वापरला जात असे. येथे बांधलेल्या पालखी दरवाजाच्या समोरच तीन काळ्या चेंबरची एक रांग आहे जी किल्ल्याची इतर कोठारे म्हणून ओळखली जाते. रायगड किल्ल्याचा टाकमक टॉक पॉइंट देखील पाहता येतो जिथून कैद्यांना फाशी देण्यात आली.
रायगड किल्ल्याविषयी तथ्ये
• सध्या हा किल्ला भारत सरकारच्या मालकीचा आहे. शिवाजी महाराज्यांच्या काळामध्ये जे बांधकाम झाले ते हिरोजी इंदुलकर (अर्कीटेक्चर) यांनी केले.
• या किल्ल्यावर मराठा, मोगल, ईस्ट इंडिया कंपनी तसेच ब्रिटीशांणी राज्य केले.
• मराठा साम्राज्याने या किल्ल्यावर १७०७ ते १८१८ पर्यंत राज्य केले. मोघल साम्राज्याने या किल्ल्यावर १६८९ ते १७०७ पर्यंत राज्य केले.
• रायगड हा किल्ला बांधणीसाठी पाषाण आणि शिष्याचा वापर केला होता. पूर्वीच्या काळी रायगड हा किल्ला मराठ्यांची राजधानी होता.
• रायगड हा किल्ला भारतातील सर्वात लोकप्रिय किल्ल्यापैकी एक आहे.
• राजा चंद्रराव मोरे यांच्या निधनानंतर हा किल्ला कमकुवत राजकर्त्यांच्या हाती गेला आणि त्याचाच फायदा घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इ. स. १६५६ मध्ये आपल्या ताब्यात घेतला. गंगा सागर या नावच एक प्रसिध्द तलाव किल्लयाच्या काठावरून वाहतो ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते.
• हा किल्ला भारतातील आश्चर्यकारक आणि उंच किल्ला आहे.
• रायगड या किल्ल्यावर जाण्यासाठी जवळ जवळ १४०० पायऱ्या आहेत. किल्ल्यामध्ये आत जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे महादरवाजा या महादरवाज्याच्या बाजूला एक बुरुज आहे त्याची उंची ६५ ते ७० फुट आहे.
• रायगड किल्ल्यावरील टकमक टोक हा २६०० फुट उंच आहे.
किल्ल्यामध्ये प्रवेश कसा करावा?
जर तुम्ही किल्ल्यावर किल्ल्याच्या संपूर्ण पायन्या (गडावर जाण्यासाठी जवळ जवळ १४०० पायऱ्या चढून जावे लागते) चढून जाणार असाल तर पाचाड गावाजवळ गडाच्या पायथ्याशी एक चीट दरवाजा आहे. तेथून आपण पायऱ्या चढून महादारवाज्या पाशी येवू शकतो आणि गड चढण्यासाठी ३ तास लागतात. जर तुम्हाला पायऱ्या चढून जायचे नसेल तर तेथे एक रोपवे ची सुविधा आणि जर तुम्ही रोपवे ने गेला तर हे राणीवसात जाणाऱ्या मेणा दरवाज्याजवळ जाते.
गडावरील राहायची सोय
गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनाशुल्क आहे.
गडावरील खाण्याची सोय
गडावर खाण्याची सोय आहे पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे.गडावर खाण्याची व विविध वस्तूंची दुकाने आहेत.
गडावरील पाण्याची सोय
गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यांत मुबलक गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. येथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते.
१. पायवाट
२. यांत्रिक दोरवाट/रज्जूमार्ग
रायगड किल्ल्यावर कसे जायचे ?
रेल्वेमार्गे : जर तुम्हाला रायगडला किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे माणगाव रेल्वे स्टेशन. आपण मुंबई, बेंगलोर, चेन्नई आणि दिल्ली येथी आपण माणगाव स्टेशनला रेल्वेने जावू शकतो आणि तेथून रायगड वर जाण्यासाठी बस किवा टॅक्सी पकडून जावू शकतो.
हवाई मार्ग : रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी थेट विमानसेवा नाही. जर तुम्हाला विमानाने यायचे असेल तर सर्वात जवळचे विमानतळ पुणे येथे आहे. पुण्यामध्ये येवून रायगड पर्यंत बस किवा टॅक्सी पकडू शकतो. पुण्याहून रायगडला जाण्यासाठी २ तास लागतात.
रस्तामार्गे : रस्त्यामार्गे आपण बसने जावू शकतो किंवा आपल्या खाजगी कारणे देखील जावू शकतो. आपण पुण्याहून किवा मुंबईहून रायगडला जावू शकतो.
टीप
हा किल्ला पाहण्यासाठी आपण सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या मधल्या वेळेमध्ये आपण हा किल्ला केव्हा हि पाहू शकतो.
• रायगड हा किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी तीन तास लागतात.
• हा किल्ला पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांच्यासाठी १० रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो आणि विदेशी पर्यटकांच्या कडून १०० प्रवेश शुल्क घेतला जातो.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, रायगड किल्ला हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही रायगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण कळवू शकता धन्यवाद.
रायगड किल्ल्यासंबंधीची पुस्तके
आजचा रायगड (पांडुरंग पाटणकर. २००६)
एका राजधानीची कहाणी - दुर्गराज रायगड (उदय दांडेकर)
किल्ले रायगड (शंकर अभ्यंकर, १९८०)
किल्ले रायगड - कथा पंचविसी (आप्पा परब, २०१५)
किल्ले रायगड - प्रदक्षिणेच्या वाटेवर (लेखक - संकलक : आप्पा परब, २००५)
किल्ले रायगड स्थलदर्शन (आप्पा परब, २०१२)
गडांचा राजा - राजांचा गड - रायगड (प्र. गो. भाट्ये, १९८६)
चला, पाहू रायगड (म.श्री. दीक्षित, प्रकाशक : शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे
चला रायगडाला - रायगड मार्गदर्शिका (प्रकाशक : शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे, १९६८)
‘तो’ रायगड (प्र.के. घाणेकर, १९९१)
दुर्गराज रायगड (गजानन आर्ते, १९७४)
दुर्गराज रायगड (प्रवीण वसंतराव भोसले, २००६)
माझे नाव रायगड (बळवंत मोरेश्वर पुरंदरे, १९६१)
राजधानी रायगड (प्रभाकर भावे, १९९७)
राजधानी रायगड (वि.वा. जोशी, १९२९)
रायगड (प. रा. दाते, १९६२)
रायगड अभ्यासवर्ग (पराग लिमये), प्रकाशक : जनसेवा समिती, विलेपार्ले, २००२.
रायगड एक अभ्यास - चला पाहू या रायगड (गोपाळ चांदोरकर, २००१)
रायगड एक अभ्यास - वैभव रायगडचे (शिवपूर्वकालीन); लेखक : गोपाळ चांदोरकर, प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन (२००४)
रायगड एक अभ्यास - शोध शिवसमाधीचा (गोपाळ चांदोरकर, २०००)
रायगड किल्ल्याची जुनी माहिती (अंताजी लक्ष्मण जोशी, १८८५)
रायगड किल्ल्याचे वर्णन (गोविंदराव बाबाजी जोशी, १८८५)
रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव (सचिन जोशी)
रायगड दर्शन (प्रल्हाद नरहर देशपांडे , १९८१)
रायगड दर्शन दुर्मीळ पुस्तकांतून (प्र.के. घाणेकर)
रायगड प्रदक्षिणा (गे. ना. परदेशी, १९८८)
रायगड प्रदक्षिणा (सोमनाथ समेळ, १९८४)
रायगड - महाराष्ट्र राज्य पदयात्रा व प्रवासयोजना (प्रकाशक : प्रसिद्धी विभाग, महाराष्ट्र सरकार)
रायगड - यात्रा, दर्शन, माहिती (प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, १९५१)
रायगड - रम्यकथा (प्रसिद्धी विभाग, महाराष्ट्र सरकार)
रायगड वर्णन (केशव अं. हर्डीकर, १९०६)
रायगड स्पर्धा - एक राष्ट्रोद्धारक कार्यक्रम (गे. ना. परदेशी, १९८६)
रायगडचा इतिहास (सुधाकर लाड)
रायगडाचा मार्गदर्शक (रायगड स्मारक मंडळ, पुणे, प्रकाशन - १८ एप्रिल, १९३५).
रायगडची जीवनकथा (शांताराम विष्णू आवळसकर, १९६२-१९७४-१९९८) : हे पुस्तक esahity.com वर आहे.
रायगडाची माहिती (गोविंद गोपाळ टिपणीस, महाडकर, १८९६)
रायगडाची सहल (रमेश द. साठे)
रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था (शं.ना. वत्सजोशी) प्रकाशक - भारत इतिहास संशोधन मंडळ, जानेवारी १९४०.
शिवतीर्थ किल्ले रायगड (सुधाकर लाड, २००४)
शिवतीर्थ किल्ले रायगड प्रदक्षिणा स्पर्धा - एक राष्ट्रप्रेरक उपक्रम (गे.ना. परदेशी, १९८४)
शिवतीर्थ रायगड.(गो.नी. दांडेकर)
शिवतीर्थ रायगड रंगीत फोल्डर (प्रकाशक : पर्यटन संचलनालय महाराष्ट्र राज्य)
शिवतीर्थाच्या आख्यायिका (प्र.के. घाणेकर, १९८५)
शिवनेरी ते रायगड (प्रकाशक : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन)
शिवरायांच्या दोन राजधान्या (गो.नी. दांडेकर]], १९८३)
शिवस्फूर्तीची स्मृती - रायगड (मधु रावकर, १९७४)
Shivaji Memorials, the British Attitude, (1974)
शिवाजी महाराजांच्या राजसिंहासनावर मेघडंबरी (प्रकाशक : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन)
श्रीमद् रायगिरौ (गोपाळ चांदोरकर)
श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे स्थापना शताब्दी स्मरणिका (म.श्री. दीक्षित)
श्रीक्षेत्र रायगड दर्शन (गो.नी. दांडेकर, १९७४)